शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

शेतकरी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:22 IST

सांगली : ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणा देत रविवारी सांगलीत शेतकºयांनी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केला. विधिमंडळावर मोर्चासह रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शासनाला जाग आणू. आता पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही देण्यात आला.सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर जनता दलाच्यावतीने शेतकरी पेन्शन परिषदेचे आयोजन ...

सांगली : ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणा देत रविवारी सांगलीत शेतकºयांनी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केला. विधिमंडळावर मोर्चासह रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शासनाला जाग आणू. आता पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही देण्यात आला.सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर जनता दलाच्यावतीने शेतकरी पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील होते. यावेळी राज्य सरचिटणीस शिवाजीराव परुळेकर, हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, बाळासाहेब कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते.शरद पाटील म्हणाले की, शेतकºयांची ताकद एकवटली तर मुख्यमंत्री, शासनालाही पळ काढावा लागेल. त्यांना पेन्शन दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आज वयोवृद्ध शेतकºयांची अवस्था बिकट आहे. मुले, सुना सांभाळत नाहीत. माणसांची पांजरपोळ असलेली वृद्धाश्रमे वाढली आहेत. १९९२ मध्ये आर. आर. पाटील यांनी विधिमंडळात शेतकºयांच्या पेन्शनवर चर्चा घडवून आणली. तसा ठरावही झाला. पण २५ वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पेन्शनसाठी राज्यव्यापी लढा उभारून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडू. दीड वर्षानी लोकसभेच्या निवडणुका आहेत. आमदार, खासदार मते मागायला येतील. तेव्हा पेन्शन द्या, मगच मतदान करू, अशी भूमिका घ्यावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेऊन जनमत तयार केले जात आहे. त्यातून शासनाला शेवटचा टोला लगावू, असा इशाराही दिला.शिवाजीराव परुळेकर म्हणाले की, नरेंद्र मोदींचे सरकार व्यापारी, उद्योजकांचे आहे. भाजपच्या पक्षनिधीसाठी दहा दिवसांत ८० हजार कोटी रुपये जमा केले. शेतकºयांना दोन हजार पेन्शन देण्यास भाजपची काय हरकत आहे. आधी वीज बिलात ३० टक्के वाढ केली; मग कृषी संजीवनी योजना लागू करून शेतकºयांचेच खिसे कापण्याचा उद्योग शासनाने केला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी मोठा लढा उभा करावा लागेल.बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले की, आधी पेन्शन, मग मतदान, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून शेतकºयांनी एकजूट व्हावे, असे आवाहन केली, तर के. डी. शिंदें यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी डॉ. जयपाल चौगुले, बी. डी. पाटील, गोपाळ पाटील, बी. आर. पाटील यांचीही भाषणे झाली.यावेळी माजी नगरसेवक मोहन जाधव, विठ्ठल खोत, संजय ऐनापुरे, आबा सागर, डॉ. लक्ष्मण शिंदे, मुनाफ पटेल, प्रमोद ढेरे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी हरिभाऊ दशवंत, शशिकांत गायकवाड उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जनार्दन गोंधळी यांनी, तर आभार शशिकांत गायकवाड यांनी मानले.भाजपचे शासन निगरगटप्रा. शरद पाटील म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजपचे शासन निगरगट आहे. शासनाने संजय गांधी, श्रावणबाळ, शेतमजूर अशा गोंडस नावाखाली काही योजना सुरू केल्या; पण त्याला इतक्या जाचक अटी लावल्या की, लाभार्थी शोधूनही सापडणार नाही. क्रिमिलेअरचे उत्पन्न ८ लाखांपर्यंत वाढविले. आठ लाख उत्पन्न असलेल्यांना सवलती मिळणार, मग ५० हजार उत्पन्न असलेल्या शेतकºयांना सवलत देण्यास शासनाचा हात आखडता का? असा सवालही त्यांनी केला.दोन शरद खवळले!राज्यातील दोन शरद खवळले आहेत. एक शरद पवार. तब्बल तीस वर्षांनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. नागपूर येथे ते मोर्चात गेले. त्यांनी शासनाची देणी देऊ नका, असे आवाहन जनतेला केले आहे. दुसरे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील. ते सर्वसामान्य शेतकºयांच्या पेन्शनसाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पेन्शन घेतल्याशिवाय माघार घेऊ नका, असे आवाहन शिवाजीराव परुळेकर यांनी केले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली