शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:22 IST

सांगली : ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणा देत रविवारी सांगलीत शेतकºयांनी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केला. विधिमंडळावर मोर्चासह रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शासनाला जाग आणू. आता पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही देण्यात आला.सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर जनता दलाच्यावतीने शेतकरी पेन्शन परिषदेचे आयोजन ...

सांगली : ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, अशा घोषणा देत रविवारी सांगलीत शेतकºयांनी पेन्शनसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार केला. विधिमंडळावर मोर्चासह रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शासनाला जाग आणू. आता पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही देण्यात आला.सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर जनता दलाच्यावतीने शेतकरी पेन्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील होते. यावेळी राज्य सरचिटणीस शिवाजीराव परुळेकर, हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, बाळासाहेब कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे उपस्थित होते.शरद पाटील म्हणाले की, शेतकºयांची ताकद एकवटली तर मुख्यमंत्री, शासनालाही पळ काढावा लागेल. त्यांना पेन्शन दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आज वयोवृद्ध शेतकºयांची अवस्था बिकट आहे. मुले, सुना सांभाळत नाहीत. माणसांची पांजरपोळ असलेली वृद्धाश्रमे वाढली आहेत. १९९२ मध्ये आर. आर. पाटील यांनी विधिमंडळात शेतकºयांच्या पेन्शनवर चर्चा घडवून आणली. तसा ठरावही झाला. पण २५ वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पेन्शनसाठी राज्यव्यापी लढा उभारून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडू. दीड वर्षानी लोकसभेच्या निवडणुका आहेत. आमदार, खासदार मते मागायला येतील. तेव्हा पेन्शन द्या, मगच मतदान करू, अशी भूमिका घ्यावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेऊन जनमत तयार केले जात आहे. त्यातून शासनाला शेवटचा टोला लगावू, असा इशाराही दिला.शिवाजीराव परुळेकर म्हणाले की, नरेंद्र मोदींचे सरकार व्यापारी, उद्योजकांचे आहे. भाजपच्या पक्षनिधीसाठी दहा दिवसांत ८० हजार कोटी रुपये जमा केले. शेतकºयांना दोन हजार पेन्शन देण्यास भाजपची काय हरकत आहे. आधी वीज बिलात ३० टक्के वाढ केली; मग कृषी संजीवनी योजना लागू करून शेतकºयांचेच खिसे कापण्याचा उद्योग शासनाने केला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी मोठा लढा उभा करावा लागेल.बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले की, आधी पेन्शन, मग मतदान, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून शेतकºयांनी एकजूट व्हावे, असे आवाहन केली, तर के. डी. शिंदें यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी डॉ. जयपाल चौगुले, बी. डी. पाटील, गोपाळ पाटील, बी. आर. पाटील यांचीही भाषणे झाली.यावेळी माजी नगरसेवक मोहन जाधव, विठ्ठल खोत, संजय ऐनापुरे, आबा सागर, डॉ. लक्ष्मण शिंदे, मुनाफ पटेल, प्रमोद ढेरे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी हरिभाऊ दशवंत, शशिकांत गायकवाड उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जनार्दन गोंधळी यांनी, तर आभार शशिकांत गायकवाड यांनी मानले.भाजपचे शासन निगरगटप्रा. शरद पाटील म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजपचे शासन निगरगट आहे. शासनाने संजय गांधी, श्रावणबाळ, शेतमजूर अशा गोंडस नावाखाली काही योजना सुरू केल्या; पण त्याला इतक्या जाचक अटी लावल्या की, लाभार्थी शोधूनही सापडणार नाही. क्रिमिलेअरचे उत्पन्न ८ लाखांपर्यंत वाढविले. आठ लाख उत्पन्न असलेल्यांना सवलती मिळणार, मग ५० हजार उत्पन्न असलेल्या शेतकºयांना सवलत देण्यास शासनाचा हात आखडता का? असा सवालही त्यांनी केला.दोन शरद खवळले!राज्यातील दोन शरद खवळले आहेत. एक शरद पवार. तब्बल तीस वर्षांनंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. नागपूर येथे ते मोर्चात गेले. त्यांनी शासनाची देणी देऊ नका, असे आवाहन जनतेला केले आहे. दुसरे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील. ते सर्वसामान्य शेतकºयांच्या पेन्शनसाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पेन्शन घेतल्याशिवाय माघार घेऊ नका, असे आवाहन शिवाजीराव परुळेकर यांनी केले.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली